सरपंच मराठी माहिती | Sarpanch Marathi Mahiti
Sarpanch Marathi Mahiti मित्रांनो, आज आपण सरपंच मराठी माहिती या विषयावर लेख नाविन्यपूर्ण लिहिण्यासाठी निवडला आहे.Sarpanch Marathi Mahiti ग्रामपंचायत मधील वास्तविक कार्यकारी प्रमुख म्हणून सरपंच खेडेगाव चा कारभार पहात असतो. या संदर्भामध्ये लेखात लिहिलेली माहिती मित्रांनो आपणास आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर्स करा.इंग्रजी काळापासून गावाचा कारभार करण्यासाठी प्रथम पंच कमिटी निर्माण करण्यात आली आणि या पंच कमिटी मध्ये एक प्रमुख गाव प्रमुख म्हणून त्याला इंग्रज मुखिया असे म्हणत. गावातील जानकर ज्येष्ठ नागरिकांना गावचा कारभार व्यवस्थित चालवण्यासाठी ही पंचकमिटी काम करत असत. Sarpanch Marathi Mahiti
![]() |
Sarpanch Marathi Mahiti |
नंतर पंच कमिटीचे रूपांतर ग्रामपंचायत म्हणून करण्यात येऊन ग्रामपंचायत मध्ये मुख्य सरपंच असायचा आणि त्याच्या मदतीला इतर सदस्य असायचे. Sarpanch Marathi Mahiti पंचायत राज मध्ये गावचा संपूर्ण राज्यकारभार व्यवस्थितपणे पाण्यासाठी आधुनिक भरतीवर ग्रामपंचायत निर्माण केली असून या ग्रामपंचायतीचा प्रमुख म्हणजे त्या गावचा प्रथम नागरिक होय.पंचायत राज्य या संकल्पनेतून ग्रामपंचायत मधील वास्तविक कार्यकारी प्रमुख म्हणून लोकांनी बहुमताने सरपंचाची निवड केलेली असते. आपणास सरपंच या पदाबाबत संपूर्ण माहिती स्पष्टपणे या लेखात नमूद करणार आहेत.Sarpanch Marathi Mahiti
सरपंचाच्या गैरहजरीमध्ये ग्रामपंचायत मधील संपूर्ण कारभार उपसरपंच संभाळत असतो. जोपर्यंत नवीन सरपंच पदाची निवड होऊन सरपंच पदावर कार्यरत होत नाही तोपर्यंत काळजीवाहू सरकार म्हणून सरपंचाच्या रिक्त जागी उपसरपंच सर्व प्रकारचे कारभार हाताळत असतात. पंचायत राज संकल्पनेतील अगदी खालच्या स्तरावर म्हणजेच खेडेगावांमध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात असते. ग्रामपंचायत मधील सदस्य उपसरपंच आणि सरपंच संपूर्ण गावाचा कारभार शासन नियमाप्रमाणे खेड्याचा विकास करण्यासाठी कार्य करत असतात. म्हणूनच आपण एका आगळ्यावेगळ्या नवीन विषयावर हा लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहेत. याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती या लेखातून खालील प्रमाणे पाहूया.Sarpanch Marathi Mahiti
Sarpanch Marathi Mahiti
मित्रांनो आपण आपल्या लेखातून सरपंच या वास्तविक कार्यकारी प्रमुख यांच्या संदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहू या.
सरपंचाची निवड
खेडेगावातील अस्तित्वा त असलेल्या ग्रामपंचायत विभागातील सरपंचाची निवड थेट जनतेमधून होते. सरपंचाच्या निवडीबाबत सरकारने शासन निर्णया अन्वये निवड कशी होईल ? याचे संपूर्ण स्पष्टीकरण शासन निर्णयात देण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार 14 जुलै 2022 रोजी शासन निर्णयात जाहीर केले की , शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांक पासून सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यात येईल असे शासन निर्णयात स्पष्टीकरण आढळून येते. 22 ऑगस्ट 2022 रोजी सरपंचाच्या निवडीबाबतचे विधेयक विधानसभेत मंजूरही झाले होते.'Sarpanch Marathi Mahiti '
सरपंचाची निवड थेट जनतेतून हे विधेयक रद्द
तत्कालीन सरकारने मंजूर केलेले विधेयक नवीन सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने सरपंच निवडीबाबतचे थेट जनतेतून शासन निर्णय रद्द करून सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार नाही असे स्पष्ट केले. यासाठी महाविकास आघाडीने सरकारने स्पष्ट केले की, राज्य मंत्रिमंडळातील 5 फेब्रुवारी 2020 रोजीच्या निर्णयानुसार राज्यातील सरकारची निवड थेट जनतेतून न होणार नाही. सरपंचाची निवड जुन्याच पद्धतीने निवडून आलेल्या सदस्याच्या बहुमताने सरपंचाची निवड केली जाईल असे सरकारने जाहीर केले. म्हणजेच पूर्वतपद्धती पुन्हा अमलात आणली. Sarpanch Marathi Mahiti
सरपंच पदाची पात्रता
1)भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
2)वय वर्ष 21 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे.
3)निवडणूक लढवणाऱ्या सरपंचाचे शैक्षणिक शिक्षण किमान इयत्ता सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
4)एक जानेवारी 1995 नंतर जन्मलेल्या उमेदवारांना इयत्ता सातवी पास असण्याची अट लागू आहेत.
सरपंच पदाचे आरक्षण
शासनाच्या शासन निर्णया नुसार सरपंच या पदासाठी आरक्षण लागू करण्यात आले आहे. सरपंच पदाचे आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये राखीव पद्धतीने रोटेशन पद्धतीचा वापर करून निवडून आलेल्या सदस्या पैकी ज्या पदाचे आरक्षण असेल त्याच पदाचा सरपंच म्हणून सदस्यातून निवड होते. Sarpanch Marathi Mahiti
महिलासाठी राखीव
महाराष्ट्र शासनाने सरपंच या पदाची महिला वर्गातून आरक्षण देताना जिल्ह्यातील एकूण सरपंचापैकी 50% महिला सरपंच असतील. हे महिलांसाठी असणारे आरक्षण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्गातील महिला सह हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. रोटेशन पद्धतीने मागासवर्गीय सरपंचाची महिला वर्गातून निवड केली जाते.Sarpanch Marathi Mahiti
मागास प्रवर्गासाठी आरक्षण
जिल्ह्यातील एकूण सरपंचापैकी 27% सरपंच मागास प्रवर्गासाठी शासनाने आरक्षित करून ठेवले आहे.
अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षण
शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लोकांची संख्या ज्या गावात जास्त असेल त्या गावासाठी सरपंच पद हे अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित करून ठेवले आहेत. मागास अनुसूचित जाती जमाती ची लोकसंख्या ज्या गावात जास्त असेल तेथे हे पद सध्या अस्तित्वात आहे. उपसरपंचासाठी आरक्षण लागू करण्यात आलेले नाही. Sarpanch Marathi Mahiti
सरपंच पदाचा कार्यकाल
सरपंचाचा कालावधी तीन जुलै 1917 च्या शासन निर्णयानुसार पूर्वीप्रमाणेच पाच वर्ष एवढा करण्यात आला आहे सरपंच पदाचा कार्यकाल साधारणतः पाच वर्षाचा निश्चित केला आहे. काही कारणास्तव निवडणुका घेणे शासनास अशक्य झाल्यास त्यावेळी सरपंचाच्या कार्यकाल पदाची मर्यादा आपोआप वाढली जाते. सरपंच स्वतः राजीनामा सुद्धा देऊ शकतो. ज्यावेळेस सरपंचाने राजीनामा दिला असेल त्यावेळेस आपोआप त्याचा कार्यकाल कमी होतो. सरपंचाला आपला राजीनामा उपसरपंचाकडे सादर करावा लागतो.नवीन सरपंच पदाची निवड होईपर्यंत त्या पदाचे सर्व कार्य व कामकाज उपसरपंच संभाळत असतो. Sarpanch Marathi Mahiti
पदच्यूती
सरपंचाने आपल्या कार्यकाळामध्ये गैरवर्तणूक केल्यास अथवा असभ्य वर्तन केल्यास त्याच बरोबर आपल्या कामांमध्ये दिरांगाई केल्याच्या कारणास्तव सरपंचाला व उपसरपंचाला व सदस्यांना त्यांच्या पदावरून दूर करता येते. हा पदच्यूत करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेमधील स्थायी समिती आहेत.Sarpanch Marathi Mahiti सरपंच आणि उपसरपंच यांना नियमाप्रमाणे पदच्युत करता येते किंवा सरपंच स्वतःहून राजीनामा सुद्धा देऊ शकतो. त्याचप्रमाणे उपसरपंच ही सुद्धा राजीनामा देऊ शकतो किंवा त्यालाही सुद्धा पदच्युत करता येते. सरपंच किंवा उपसरपंच यांची निवड पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद मध्ये झाली तर आपोआप त्यांचे पद रिक्त होते. एकच व्यक्ती दोन पदावर कार्य करू शकत नसल्यामुळे हा नियम येथे शासनाने मान्य केला आहे. रिक्त झालेले सरपंच किंवा उपसरपंच हे पद नव्याने नियुक्त केले जातात."Sarpanch Marathi Mahiti "
अविश्वासाचा ठराव
सरपंच किंवा उपसरपंच हे शासन निर्णयानुसार योग्य कार्य करत नसेल व पदाचा दुरुपयोग करत असल्यास संपूर्ण सदस्य सरपंच किंवा उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करू शकतात. सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरोधात ग्रामपंचायत मध्ये अविश्वासाचा ठराव एकूण सदस्याने बहुमताने मंजूर केल्यास सरपंच किंवा उपसरपंच यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो.Sarpanch Marathi Mahiti
अविश्वास ठराव दाखल करण्याची पद्धत
सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करायचा असेल तर ग्रामपंचायत सदस्यांना अविश्वास ठराव दाखल करण्याबाबतची पूर्वसूचना त्या विभागातील तहसीलदाराला कळवावी लागते. म्हणजेच तहसीलदाराला पूर्व सूचना देण्यात येतेSarpanch Marathi Mahiti
तहसीलदाराला अविश्वास ठरावाबाबतची पूर्व सूचना मिळताच संबंधित विभागातील तहसीलदाराला एका आठवड्याच्या आत ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक आमंत्रित करावी लागते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार असतो. शासन निर्णयानुसार जुलै 2017 पासून सरपंच किंवा उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करायचा असेल तर ग्रामपंचायत मधील एकूण सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने अविश्वास ठराव दाखल करावा लागतो. Sarpanch Marathi Mahiti
तहसीलदाराच्या विशेष बनवलेल्या सभेमध्ये अविश्वास ठरावावर तहसीलदार संपूर्ण चर्चा करतात. त्यानंतर सभेला उपस्थित असलेल्या एकूण सदस्य पैकी 75 टक्के सदस्यांनी अविश्वास ठराव बहुमताने मंजूर करावा लागतो. अविश्वास सभेतील ठरावावर गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांचे गुप्त मतदान होते. गुप्त मतदान हे 75 टक्के अविश्वास ठरावाच्या बाजूने मंजूर झाल्यास सरपंच किंवा उपसरपंचाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. Sarpanch Marathi Mahiti
अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर त्या विभागातील जिल्हाधिकारी यांनी एक अधिकारी नियुक्त करून विशेष ग्रामसभा बोलवण्यात येऊन या ग्रामसभेत गुप्त मतदान पद्धतीने ग्रामस्थांच्या सध्याच्या बहुमत पद्धतीने ठराव संमत झाला तर सरपंच यांना पदावरून दूर केले जाऊ शकते. उपरोक्त अविश्वास ठरावाच्या बाबत पद्धत ही 15 जानेवारी 2020 रोजी दुरुस्ती करून अस्तित्वात आणली आहेत. अगदी थोडक्यात शब्दांमध्ये सांगावयाचे झाले तर सरपंचावरच अविश्वास ठराव समत होण्यासाठी सदस्यांच्या बहुमताबरोबर विशेष ग्रामसभेचे बहुमत देखील महत्त्वाचे असते हे विसरून चालणार नाही.Sarpanch Marathi Mahiti
अविश्वास ठरावाबाबत अपवाद
तीन जुलै 2017 पासून अतिशय महत्त्वाचा अविश्वास ठरावाबाबत अपवाद पुढील प्रमाणे पाहूया.
सरपंच व उपसरपंच यांनी ज्या दिवशी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळण्यास हाती घेतला असता पहिले दोन वर्ष संपूर्ण कारभार व्यवस्थित केला असेल तसेच पाच वर्ष पूर्ण कालावधी संपण्याअगोदर शेवटच्या सहा महिन्यांमध्ये सरपंच व उपसरपंच यांच्यावर सदस्यांना अविश्वास ठराव दाखल करता येत नाही. हा एक महत्वपूर्ण अपवाद आहेत.Sarpanch Marathi Mahiti
मानधन
शासन निर्णयाप्रमाणे सरपंचाला व उपसरपंचाला मानधन देण्याची पद्धत अस्तित्वात आली आहे.
1) ग्रामपंचायत ची लोकसंख्या झिरो ते 2000 पर्यंत असेल तर सरपंचाला तीन हजार रुपये मानधन दिले जाते. तर उपसरपंचाला एक हजार मानधन दिले जाते.
2) ग्रामपंचायत ची लोकसंख्या 2001 ते 80 00 असेल तर सरपंचाला 4000 रुपये मानधन दिले जाते तर उपसरपंचाला 1500 रुपये मानधन दिले जाते.
3) ज्या ग्रामपंचायतची लोकसंख्या 8001 पेक्षा जास्त असेल तर त्या गावातील सरपंचाला 5000 रुपये मानधन दिले जाते. तर उपसरपंचांना 2000 रुपये मानधन दिले जाते. Sarpanch Marathi Mahiti सरपंचाचे मानधन शासन मंत्रिमंडळ निर्णय दिनांक 30 जुलै 2019 रोजी निर्णयाप्रमाणे प्रत्यक्ष मानधनाची कार्यवाही एक जुलै 1919 पासून मानधनात वाढ करण्याचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
सरपंचाचे कार्य व अधिकार
1) सरपंच हा ग्रामपंचायतीचा वास्तविक अधिकार प्रमुख म्हणून कार्य करतो.
2) सरपंच हा ग्रामपंचायत व ग्रामसभा यांच्यामध्ये समन्वय साधणारा एक प्रकारचा दुवा आहेत.
3) सरपंच हा ग्रामपंचायत व पंचायत समिती यांच्यामध्ये समन्वय साधणारा महत्त्वपूर्ण एक दुवा आहे.
4) ग्रामपंचायत ची सभा बोलवण्याचा अधिकार सरपंचाचा आहे.
5) गावातील सर्व लोकांची ग्रामसभा आयोजित करण्याचा अधिकार सरपंचाचा आहे.
6)ग्रामसभेचे अध्यक्ष स्थान सरपंच भूषवीत असतो.
7) ग्रामपंचायत बाबतची आवश्यक असणारीसंपूर्ण माहिती पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि राज्य शासन यांना कळवण्याचा मुख्य अधिकार सरपंचाचा आहे.
8) ग्रामपंचायत मधील नोकर वर्गावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य सरपंच करत असतो.
9) ग्रामसभेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य सरपंच करतो.
10) ग्रामपंचायत बाबत संपूर्ण महत्त्वपूर्ण बाबीवर बहुमताने निर्णय घेण्याचे कार्य सरपंचाला करावे लागते.
11) सरपंचाच्या गैरहजेरी मध्ये वरील दहा कार्य दर्शविलेले उपसरपंच पार पाडत असतो.
12) सरपंच आणि उपसरपंच दोघेही गैरहजर असल्यास वरील कामकाज हे ग्रामसभेतील वरिष्ठ आणि ज्येष्ठ सदस्य यांच्याकडे सपूर्त केले जाते.
13) ग्रामपंचायत ची सभा प्रत्येक महिन्याला बोलवण्यात येऊन महत्वपूर्ण निर्णय घेण्याचे काम सरपंच करतो.
सरपंचाचा विशेष अधिकार
सरपंचाला शासन निर्णयाप्रमाणे एक विशेष अधिकार देण्यात आला आहे. सरपंच थेट जनतेतून निवडला असला तरी तो ग्रामपंचायतीचा एक सदस्यच असतो. ग्रामपंचायत चा एक सदस्य म्हणून त्याला एखाद्या विषयावर निर्णायक 'एक मत' देण्याचा विशेष अधिकार. उपसरपंचाच्या निवडीमध्ये जर दोन सदस्यांना समसमान मते पडली तर त्या ठिकाणी सरपंच हा 'एक मत ' ऐदेऊ शकतो. त्याने दिलेले ते एक मत निर्णायक मत असते. ते ज्याच्या बाजूने पडेल किंवा प्राप्त होईल तो सदस्य उपसरपंच होईल. किंवा ग्रामपंचायत मध्ये महत्त्वाच्या कार्यावर ग्रामपंचायत सदस्यांची सभा आयोजित केली.
सभेमध्ये अनेक विषयावर चर्चा केली जाते. चर्चेअंती महत्त्वपूर्ण ठराव ग्रामपंचायत पारित करीत असते. एखाद्या ठरावावर पारित करताना समसमान मते ग्रामपंचायत सदस्यांची पडली तर त्या ठरावावर 'एक मत' देण्याचा मुख्य अधिकार सरपंचास आहे. या एक मतामुळे तो ज्या बाजूने ठरावावर मत देईल तो ठराव पारित होईल. याचाच अर्थ सरपंचाला विशेष अधिकार जो देण्यात आला आहे.
अधिकाराला 'एक मत' अधिकार असे म्हणतात. तो विशेष अधिकार फक्त सरपंचांना ग्रामपंचायत मध्ये बहाल करण्यात आला आहे. सरपंचाचे 'एक मत ' निर्णय मत ठरते. याबाबत उच्च न्यायालयाच्या खंडपीने पाच ऑक्टोबर 2018 रोजी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. Sarpanch Marathi Mahiti
सारांश
भारत हा 75 टक्के खेड्यांचा देश आहे. 75 टक्के शेतकरी खेड्यात राहतात. या खेड्याचा विकास करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पंचायत राज मध्ये शासनाने ग्रामपंचायत यांच्याकडे दिली आहे. ग्रामपंचायत मधील प्रमुख वास्तव कार्यकारी प्रमुख म्हणून खेड्याचा विकास करण्यास करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत यांच्याकडे देण्यात येते. खेड्याच्या विकासासाठी शासनाकडून ग्रामपंचायत ला भरपूर प्रमाणात विविध विकास कामासाठी निधी देण्यात येतो. हा संपूर्ण निधी ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांच्या बहुमताने खेड्याच्या विकासासाठी खर्च केला जातो . खेड्यातील प्रमुख महत्त्वाचे कामकाज जवळपास सरपंचाकडेच असते. म्हणूनच मित्रांनो आपण आपल्या या लेखातून सरपंच या पदाबाबत संपूर्ण माहिती या लेखात अभ्यासली आहे. सरपंचाचे स्थान, दर्जा आणि अधिकार यांची संपूर्ण जबाबदारी सरपंचावर अवलंबून असते. सरपंच हा गावाचा एक उच्च पदभुशीत पदसिद्ध गाव प्रमुख असतो.Sarpanch Marathi Mahiti
गावातील सर्व लोक सरपंचाच्या सल्ल्याने गावाचा विकास करून घेत असतात. गावाचा लोकनियुक्त लोकांमार्फत निवडलेला प्रमुख अधिकारी म्हणजे सरपंच होय. याबाबत संपूर्ण माहिती ह्या लेखात देण्याचा प्रयत्न ब्लॉगरने या ब्लॉग पोस्ट लेखातून केला आहे. या लेखाच्या संदर्भामध्ये वाचकांना काही तांत्रिक अडीअडचण आल्यास किंवा त्रुटी आढळल्यास संबंधित वाचकांनी ब्लॉग पोस्ट कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या सूचना, प्रतिक्रिया, प्रतिसाद आणि त्रुटी आवश्यक कळवा. आपण कळवलेल्या त्रुटी बरोबर असल्यास या लेखामध्ये त्वरित सुधारणा करून लेख अद्यावत करण्यात येईल. हा लेख मित्रांनो वाचल्यानंतर आपल्या वाचक मित्रांना वाचनासाठी आवश्यक शेअर करा. Sarpanch Marathi Mahiti
FAQ
1) ग्रामपंचायत चा वास्तविक प्रमुख कोण असतो?
उत्तर-ग्रामपंचायत चा वास्तविक प्रमुख सरपंच असतो.
2) निर्णायक मत देण्याचा विशेष अधिकार ग्रामपंचायत च्या कोणत्या सदस्या कडे अधिकार असतो?
उत्तर-निर्णायक मत देण्याचा अधिकार विशेष अधिकार म्हणून सरपंचांना देण्यात आला आहे.
3) सरपंच या पदासाठी वयाची अट किती आहे?
उत्तर-सरपंच या पदासाठी वयाची आठ 21 वर्षे पूर्ण ही आहेत.
4) महिलांसाठी सरपंच आरक्षण किती टक्के आहे?
उत्तर-संपूर्ण जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायत मध्ये महिलांना 50% आरक्षण आहे.
5) सरपंचाच्या गैरहजरीमध्ये ग्रामपंचायतचे कामकाज कोण पाहतो?
उत्तर-सरपंचाच्या गैराजरीमध्ये ग्रामपंचायतचे कामकाज उपसरपंच पाहतो.
अधिक माहितीसा आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.
अधिक माहितीसा आपण आमचे खालील VIDEO आवश्यक पाहा.