पालक हेच गुरु मराठी माहिती | Parents Is The Teacher Marathi Mahiti
प्रस्तावना
Parents Is The Teacher Marathi Mahiti मित्रांनो, आज आपण पालक हेच गुरु मराठी माहिती यासंदर्भामध्ये या ब्लॉग पोस्ट लेख मध्ये माहिती पाहणार आहोत. कारण मुलांना घडवण्यासाठी पालकाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मुलांमध्ये असलेल्या निरीक्षण शक्ती गुणाच्या आधारे मूल आई-वडिलांना नेहमी बोलत असतात. प्रत्येकाने हे बोलणे ऐकून घेण्याची सवय लावा.'पालक हेच गुरु 'या विषयावर कोणत्याही ब्लॉगर ने ब्लॉग पोस्ट साठी लिहिला नाही. Keyword Generator मध्ये Search केले असता एकही की Key Word आला नाही .त्यामुळे हा नाविन्यपूर्ण विषय लेखन करण्यासाठी हाती घेतला आहे.
मित्रांनो, पालक म्हणजेच आई - वडील हेच मूल जन्माला आल्यानंतर कुटुंबात प्रथम मुलाचा संपर्क हा आईशी येतो. त्यानंतर मुलांचा संपर्क वडीला शी येतो. मुलगा तीन वर्षाचा झाला की आई-वडिलांच्या संपर्काने बऱ्याच महत्वपूर्ण गोष्टी कुटुंबातील मुलगा शिकत असतो. मुलांना शिकवणारे पहिले गुरू जर कोण असेल तर ते त्यांचे पालक होय.म्हणूनच या संदर्भाने आपण हा लेख पाहणार आहोत.
मित्रांनो, मूल लहान असताना निरीक्षण शक्तीच्या आधारे आपले आई-वडिलांच्या एकमेकांशी कसे वागतात आणि एकमेकांशी संवाद कशाप्रकारे करतात. ह्या सर्व बाजूचे निरीक्षण कुटुंबात बालक करत असते. बालक हे आपल्या वयाच्या बुद्धी नुसार पालकाच्या वागण्याचा आणि बोलण्याचा अर्थ लावीत असते. मूल हे आपल्या आई-वडिलांचे म्हणजेच पालकाचे अनुकरण करत असते. अनुकरण हे कधी विसंगत असते तर कधी सुसंगत असते. दोन्ही बाजूचे टीकात्मक परीक्षण कुटुंबातील बालके करतात. त्यानुसार बालकांचे पुढील भवितव्य आपल्या कुटुंबा तूनच ठरत असते.म्हणूनच आपण आज या महत्वपूर्ण लेखा विषयी माहिती पाहू या.
Parents Is The Teacher Marathi Mahiti |
आई -वडील हेच गुरु
आई आणि वडील हे मुलाचे गुरु कसे आहेत याबाबत सविस्तर माहिती या लेखात पुढील प्रमाणे ब्लॉगर ने स्पष्टपणे नमूद केली आहेत.
निरीक्षण शक्तीतुन अनुकरण
मुलाचा कुटुंबातील नेहमी संपर्कात येणाऱ्या व्यक्तीच्या बाबत माहिती घेणे आवश्यक आहे. मूल जन्मल्या बरोबर जन्मताच सुप्त गुण म्हणजे निरीक्षण शक्ती ही त्याला प्राप्त झालेली असते. आपल्याला त्या मुलांची निरीक्षण शक्ती कशी आहे हे मोजता येत नसले तरीसुद्धा नक्की मुलांना निरक्षण शक्ती असते. असलेल्या निरीक्षण शक्तीच्या आधारे मूल कुटुंबामध्ये नेहमी ज्या व्यक्तीच्या संपर्कात येतात त्या व्यक्ती चे निरीक्षण करून त्याप्रमाणे वर्तन करण्यास सुरुवात करतात. मूल हे अनुकरणीय असल्यामुळे निरीक्षण शक्ती तुन खूप काही चांगले आणि वाईट दोन्ही गुण आत्मसात करून भावी जीवनात त्याचे अनुकरण करत असतात.'Parents Is The Teacher Marathi Mahiti 'म्हणून पालकांनो आपल्या मुलाबद्दल काळजी घेण्यासाठी ब्लॉगर ने हा लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे.
मुलांचे व्यक्तिमत्व घडवणारे गुरुपालक
मुलांना घडवण्यासाठी आणि चांगले व्यक्तिमत्व प्राप्त करून देण्यासाठी कुटुंबातील आई-वडील हे पहिले गुरु आहे. कुटुंबामध्ये आई-वडिलांनी कसे वागावे? याबाबत स्वतःच्या महत्त्वपूर्ण भूमिका पूर्ण करणे प्रथम त्यांना त्याची गरज आहे. प्रथम पालकाने समजून घेतली पाहिजे की, आपला मुलगा किंवा बालक घरी असेल तर चांगल्या प्रकारची वर्तणूक आई-वडिलांनी घरात करणे आवश्यक आहे
आई-वडिलांची वर्तणूक
मूल जन्मल्यानंतर क्रमाक्रमाने हळूहळू ते एक एक दिवसाने मोठे होत असतात. मूल जसे मोठे होत असतात तसतसे ते घरातील बारीक सारी सर्वांच्या वागणुक कडे लक्ष देत असतात. म्हणून मुलगा आपला कसा घडावा आणि त्याचे व्यक्तिमत्व कसे घडवावे हे प्रथम जर कोणाच्या हातात असेल तर ते पालकांच्या हातात असते. मुलाचे व्यक्तिमत्व पालकाच्या वर्तणुक तून कसे घडते ?हे प्रथम कोणालाही समजत नाही. कारण ही संपूर्ण प्रक्रिया मानसशास्त्र वर आधारित आहेत. म्हणूनच मूल कुटुंबात कधी बोलते .तर कधी बोलत नाही पण निरीक्षण चालूच असते. मूल घडवण्य मध्ये पालकाची वर्तणूक स्वतः स्वतःचे आत्म निरीक्षण करून करावे. पालकांनी आपल्या मुलाला समजून घेणे ही आज काळाची नितांत गरज आहे.
पालकाची भूमिका
आई-वडिलांनी आपले मूल किंवा बालक घडवत असताना आपली वर्तणूक पालकाची भूमिका म्हणून महत्त्वपूर्ण कार्य करणारी भूमिका असते. मुलगा चांगल्या व्यक्तिमत्त्वाचा घडावा त्याच दृष्टिकोनातून घरात पालकांनी वर्तणूक करावी. मुलाला योग्य प्रकारे सांभाळण्याची जबाबदारी जर प्रथम कोणावर असेल तर ती त्यांच्या आई वडिल वर म्हणजेच पालकावर असते. पालकावर असलेल्या जबाबदारीचे भान ठेवून आपल्या मुलांना योग्य प्रकारचे कुटुंबातील अनौपचारिक पद्धतीचे चांगले गुण संपन्न करणे हे पालकाचे कर्तव्य आहे.मुलाचे पहिले गुरु जर कोण असेल तर ते त्यांचे आई आणि वडील हे असतात.
आचार व विचार सुसंगत महत्वपूर्ण भूमिका
पालकाला आपल्या मुलाला घडवताना कुटुंबातील शिक्षक म्हणून स्वतःच्या घरातील स्वतःचे आचरण व स्वतःचे विचार यांच्यामध्ये सुसंगती असणे आवश्यक आहे. आचार आणि विचार यामध्ये सुसंगत पणा नसेल तर त्याचा विपरीत परिणाम मुलाच्या शिक्षणावर झाल्याशिवाय राहत नाही. आई वडील या नात्याने घरात म्हणजेच कुटुंबात आचरण करताना मुलावर योग्य संस्कार करावे. पालकांनी आपल्या स्वतःच्या मुलांबाबत काही महत्त्वपूर्ण गोष्टी समजावून घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे. पालकाचे मुलाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.म्हणून पालकाने केवळ मुलांना उपदेशाचे आचरणाचे योग्य संस्कार करण्याची अपेक्षा सर्वत्र जगभर दिसून येते.
पालक स्वतः टीव्ही पुढे बसून जेवण करतात. पालक टीव्ही समोर बसून जेवण करत असल्याचे निरीक्षण मूल करते किंवा बालक करते. जो पालक टीव्ही पुढे बसून टीव्ही तील मालिका पाहत व आपल्या मुलाला म्हणतात बाबू टीव्ही पुढे बसून जेवण करू नको. या आचरणात किती विसंगती आहे हे पहा. स्वतः टीव्ही पुढे बसून जेवण करणे आणि मुलांना सांगणे की तू टीव्ही पुढे बसून जेवण करू नकोस. येथे पालकाचे कर्तव्य चुकत आहे. पालकांनी कधीही टीव्ही पुढे बसून जेवण करत नसेल तर अधिकारवाणीने आपल्या मुलाला सांगू शकतात बाळ तुम्ही पुढे बसून जेवण करू नकोस.
व्यसन मुक्त व्हा
मित्रांनो, पालकांना ब्लॉगर या नात्याने अशी माहिती स्पष्ट करतो की, पालकांनो तुम्ही स्वतः व्यसनमुक्त व्हा. कारण आपली मुले लहानपणी आई-वडिलांवर भरपूर प्रेम करतात. परंतु मोठेपणी हीच मुले आईबापाचे मूल्यमापन करू लागतात. बाप दारू पीत असेल तर मुलगा शंभर टक्के दारूची चव घेऊन पाहिल्याशिवाय राहणार नाही. कुटुंबात आपण वागताना अनेक गोष्टीचे भान ठेवून योग्य कर्तव्य पार पाडणे पालकाची गरज असते. घरात पालक व्यसनी असेल. दररोज दारू पिऊन येत असेल तर त्या घरातील लहान मुले अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीत असतात. आता आपण काय करावे? गोंधळलेल्या परिस्थितीतील लहान मुलांना त्यावेळी वर्तन कसे करावे हे समजत नाही. भारतीय समाजातील आज बहुसंख्येने प्रत्येक घरात पालक फार मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेलेले आढळून येतात. त्यामुळे त्यांचे आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होते. पालकाचा चांगला आदर्श मुले घेत असतात. घेतलेल्या आदर्श गुणामुळे विद्यार्थी आदर्श विद्यार्थी होतो. पाल्याच्या विनाशाला कोण कारणीभूत ठरू शकतो तर तो व्यसनी पालक. पालकांना येथे सांगावा असे वाटते प्रथम तुम्ही व्यसन मुक्त व्हा.Parents Is The Teacher Marathi Mahiti आपल्या मुला पुढे तुमचा आदर्श दाखवा.
आदर्श युक्त चारित्र्य
आपल्या पाल्याला आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पालकाला स्वतःचे चारित्र्य आदर्श युक्त असावे लागते. स्वतः व्यसनमुक्त होऊन मुलांसमोर आदर्श निर्माण करा. मुलगा तुमच्या आदर्शाचे अनुकरण करेल. जर तुम्ही मुलांसमोर दररोज सिगारेट ओढत असाल किंवा अतिशय मदय धुंदीत उशिरा रात्री घरी येत असाल किंवा परतत असाल तर अशा पालकांची मुले कितपत निर्व्यसनी असेल हे सांगता येणार नाही. आपल्या मुलांना घडवण्यासाठी स्वतःचे चारित्र्य व स्वतःचे गुण चांगले असणे अपेक्षित आहे. आई वडील किंवा पालक जर निर्व्यसनी असेल तर त्याचा मुलावर चांगला परिणाम होतो आणि अशी मुले व्यसनाकडे वळण्याची खूप कमी प्रमाणात शक्यता असते. येथे मुद्दाम शक्यता हा शब्दप्रयोग केला आहे. कारण अनेक कुटुंबात बाप निर्व्यसनी आहेत पण त्यांची मुले व्यसन धारी बनली आहे. हा परिणाम मुलगा कुटुंबाच्या बाहेर पडल्यानंतर वाईट मुलांच्या दोस्त मित्रांच्या सहवासात येऊन वाईट गुण संपन्न करतात व मित्र व्यसन धारी आहे म्हणून मुलगाही सुद्धा व्यसन नाही. मित्राच्या सोबत राहिल्यामुळे होण्याची 100 % दाट शक्यता आहे.
धाक हवा.
आई-वडिलांचा मुलांवर नेहमी सकारात्मक धाक असायला हवा. घरात मुलगा वाईट वर्तणूक करत असेल किंवा त्याच्याकडून काही चूक झाल्यास त्याच्यावर खूप जोराने ओरडण्या पेक्षा सकारात्मक बाजूने प्रथम त्याला सूचना देत चला. आपल्या मुलाला प्रेमाने समजावून सांगण्याचे प्रथम तुम्ही सकारात्मक तंत्र वापरा. मुलांकडून घरात काही एखादे काम करताना त्यांच्याकडून चूक झाली तर अशा मुलांसोबत पालकांनी स्वतः बसून ती चूक मुलाच्या हाताने दुरुस्त करून स्वतः त्याला त्याबाबत चूक दुरुस्त करण्यासाठी मार्ग दाखवा. योग्य मार्ग दाखवल्या स मुलगा योग्य मार्गाने जाईल.
विश्वास ठेवा
आजच्या आधुनिक युगात कुटुंब पद्धतीत बदल झालेला आहे. पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती. त्या कुटुंब पद्धतीमध्ये मुलांना संस्कार करणारे आजी आणि आजोबा असायचे. आता विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये पती-पत्नी आणि त्यांची मुले एकत्र राहतात. पती-पत्नी दोघेही नोकरीस बाहेर जातात त्यामुळे त्यांच्या पाल्याकडे दुर्लक्ष होते. काही ठिकाणी पाळणाघरात मुलांना सोडून नोकरी करणारे पती-पत्नी पुणे, मुंबई ,नागपूर आणि मोठमोठाल्या शहरात हे असेच चालू आहे
पालकांनी प्रथम आपल्या मुलांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी पाल्याच्या बाबत पाल्यावर हमखास विश्वास ठेवा. पालकांनी आपल्या मुलावर विश्वास ठेवून समजूती च्या मार्गाने समजून सांगा ऐकत नसेल तर थोडा त्याच्यावर धाक द्यायला कमी करू नका. योग्य ठिकाणी विश्वासाने प्रेम दाखवा. मुलांकडून शिस्त बिघडत असेल किंवा काही गैरकृत्य होत असेल तर हमखास आवश्यक त्याला प्रेम युक्त धाक देणे. पालकाचे कर्तव्य आहे. आता जुनाट पद्धतीचा धाक देण्याची गरज नाही. "पालकांनी एक जोराने भटका मारला की मूल सरळ वागत."ही पद्धत फार जुनाट झाली आहे." Parents Is The Teacher Marathi Mahiti "मानसशास्त्रात अनेक नवनवीन पद्धती निर्माण झाल्या आहेत.
जुनाट पद्धतीचा त्याग करा
पालकाने जुनाट पद्धतीचा त्याग करा. मुलांना प्रेमाने जवळ घ्या. पाल्य आणि पालक यांच्यामध्ये दुरावा निर्माण होईल या पद्धतीने आई-वडिलांनी वागू नये. सर्वच पालकांना स्वतःचे अनेक कामे असून इतर जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना स्वतःच्या आकांक्षा कडे लक्ष देत असतानाच पाल्या तील गुण आणि अवगुण दोन्ही ओळखून या दोन गोष्टींमध्ये समन्वय साधून म्हणजेच ताळमेळ गाठून पाल्याचा सर्वांगीण विकास आई वडील यांना करावयाचा असतो. सध्याच्या घडीला पालकाचे जग वेगळे आहेत तर मुलाचे जग वेगळे आहेत.
जगातील अनेक चांगल्या वाईट गोष्टीचे मुले निरीक्षण करून स्वतःमध्ये मनावर बिंबून घेतात .त्यामुळे पाल्याच्या मनावर वाईट गोष्टीचा परिणाम लवकर होतो तर चांगल्या गोष्टीचा परिणाम फार उशिरा होत. याचे पालकांनी भान ठेवून पाल्य मधील चांगल्या गुणांना म्हणजेच सुप्त गुणांना विकास करण्यासाठी त्याला वेळोवेळी लागणाऱ्या मार्गदर्शनपर सल्ला देणे पालकाची जबाबदारी आहेत. जगातील अनेक बालके आपल्या आई-वडिलांच्या धाकाने अनेक वेळेस खोटे बोलू लागतात त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व दुर्बळ होते.म्हणून मुलांना धाक जरूर द्या पण भीती देऊ नका. जी गोष्ट जगात धाकाने नाही ती गोष्ट प्रेमाने होऊ शकते. हे मानसशास्त्र ने सिद्ध केले आहेत.
हिटलरने सर्व जगाला धाक दाखवला आणि धाका पोटी शेवटच्या क्षणी योग्य सुसंस्कार न झाल्यामुळे हिटलर सारख्या महान हुकूमशा वादी नेतृत्वाला आत्महत्या करावी लागेल. धाक दाखवून सर्वच गोष्टी चांगल्या होईल हे सांगता येत नाही. हिटलरचे उदाहरण घेण्याचे कारण म्हणजे हिटलर वर त्यांच्या आई-वडिलांचे योग्य संस्कार न झाल्यामुळे जगात दोन महायुद्ध घडून आणली. परिणाम स्वतःच्या सत्यानाश झाला. आपल्या पाल्याची अशी होऊ नये यासाठी हे उदाहरण उचित वाटत आहे म्हणून घेतले आहे
स्वतःचा ताण इतरांना देऊ नका.
विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, आजच्या नाविन्यपूर्ण लेखात सर्व स्पष्टीकरणे ही नाविन्यपूर्ण स्पष्ट करण्यात येत आहे. वडिलांना अनेक कारणामुळे ताण येतो. कार्यालयात किंवा एखाद्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पालकावर कार्यालयातून ताण येतो. आलेल्या ताण तणावाची परिणाम वाईट होतात. ऑफिस मधून घरी आल्यावर वडील आपल्या पत्नीस किंवा बायको मारतात. आईला वडिलांनी मारल्यामुळे. आई स्वतःवर आलेल्या ताणा मध्ये विचित्र परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना मारते.
आपल्याला आलेल्या ताणाचा मुलाला मारल्यामुळे मुलावर विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. अशावेळी मुलांना घरामध्ये असुरक्षित वातावरण मिळते. त्यामुळे घरातील मुले आई-वडिलांच्या भांडणात संपूर्ण गोंधळून गेलेले असतात. मुले गोंधळून गेल्यानंतर त्यांचा सर्वांगीण विकास आणि स्वतः जवळ असणाऱ्या सुप्त गुणांचा विकास करण्यास योग्य मार्गदर्शन आई-वडिलांकडून मिळत नाही. आई-वडिलांनी आपल्या मुलांवर अत्यंत विश्वास ठेवा.
मूल घरात असेपर्यंत तरी भांडण करू नका. म्हणजेच घरात मुलांच्या उपस्थितीत भांडणे नसावी हे माझे मत आहे. कदाचित आपण या मताशी सहमत असू शकते किंवा नसू शकते. पण सत्य ती गोष्ट कधीच लपत नसते. एक गोष्ट चूक केल्यानंतर पुढे शंभर चुकांना सामोरे जावे लागते. लागतात. चू कधी न कधी समोर येतेच.
आई-वडिलांनी मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्या भोवती चांगले वातावरण निर्माण करण्याचे कर्तव्य पालक वरच असते. म्हणूनच पालक हेच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे गुरु आहेत. मुलांना जोपर्यंत शाळेत घालत नाही किंवा जात नाही तोपर्यंत त्यांच्यावर संस्कार युक्त वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी आईवडिलांची आहे.
भावी भांडवल
मित्रांनो, आजच्या डिजिटल धावत्या जगामध्ये जग एवढं गतिमान झाले आहे की, घरातून बाहेर पडणारा व्यक्ती घरात परत येईल का हे सांगता येत नाही. एवढी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. गतिमान असणाऱ्या आजच्या युगात आणि जीवन प्रणाली पती आणि पत्नी नोकरीच्या निमित्ताने दिवसभर बाहेर राहून थकवा येऊन दररोजचे दैनंदिन कार्य सर्व बदललेले असते.
अशा परिस्थितीमध्ये जीवन जगताना तान येऊ देता आणि थकवा न येऊ देता सहाजिकच आपल्या पाल्याकडे काळजीपूर्वक रीतीने देखभाल करून त्यांच्यावर आत्म निर्भवतीने प्रेम करा. तुमचे सर्व काही बरोबर असेल पण तुम्ही जगत असताना तुमचे भांडवल भविष्यात कोणते असेल तर ते तुमचे मुले. आपला मुलगा आपले भविष्यातील भांडवल आहे असे समजून नियमित घरामध्ये योग्य वर्तन आवश्यक करा.आज गुंतवलेल्या भांडवलात उद्याचे तुमचे भविष्य तुमच्या मुलांवर अवलंबून असेल.
पाल्यास वस्तुस्थिती शिकवा
पालकांनीआपल्या मुलास सर्व वस्तुस्थिती जशी आहे तशी सांगा. आजच्या जगात पाल्याच्या भावना समजावून येण्याची गरज आहे. पाल्याने सांगितलेली परिस्थिती पालकांनी समजावून घेण्याची गरज आहे. पाल्याने आपल्या पालक कडे कोठारा तील कठोर भावना किंवा इच्छा व्यक्त केल्यास पालकांनी गोंधळून न जाता त्या सर्व भावना परिपूर्ण रीतीने अगोदर समजावून घ्या. पाल्याच्या भावना न समजून घेता नेहमी पाल्यावर रागावून जर तुम्ही सतत पडल्यास हुकूमशाही रीतीने आज्ञा देत राहिल्यास ते येथे योग्य होणार नाही. पाल्यावर न रागावता खरी वस्तुस्थिती समजून घ्या आणि तुमची वस्तू स्थिती पण पाल्यास समजून सांगा. दोघांच्या विचारांचा समतोल साधा. काही जबाबदाऱ्या पाल्याकडे सुद्धा देणे आवश्यक आहे. जबाबदारीच्या भावनेतून त्यांच्यावर विश्वास दाखवून त्याला व्यवहारिक ज्ञानाच्या बाबतीत त्याचा आत्मविश्वास वाढवणे .पालकाच्या हातात असते
विचित्र परिस्थितीतील वर्तणूक
पालकांनी पाल्यावर आत्मविश्वास दाखवून काही जबाबदारी दिली तर त्यांच्याकडून पूर्ण होईल ही अपेक्षा होईलच असे सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये पालकांनी पाल्यावर राग काढू नका. त्यामुळे मुले गोंधळून जातात. गोंधळलेल्या स्थितीत पालक विचित्र परिस्थिती निर्माण करून ठेवतात. कदाचित फार मोठ्या प्रमाणात मुलांना मारझोड सुद्धा करतात. हे करणे आयोग्य आहे. मुलाकडून चुका होणारच. चुका झाल्यानंतर पालकालाराग येणारच हे निर्विवाद सत्य आहे.
अशा परिस्थितीत पालकावर कितीही ताणाला तरी पालकांनी शांत रितीने मुलांच्या सर्व समस्या समजावून घ्या. निर्माण झालेल्या विचित्र परिस्थितीतून बाहेर पडण्याचे मार्ग शोधा. जे घडू नये ते घडले. पुढे असे घडू नये यासाठी पालकांनी योग्य मार्गदर्शन गुरु या नात्याने आपल्या पाल्याला केल्या स त्यातून आणि येणाऱ्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. कारण आई वडील हे त्याचे गुरु आहेत. पहिले गुरु आहेत. येथूनच शिक्षणाला सुरुवात झालेली असते.
तुमच्या विचित्र परिस्थितीमुळे कदाचित विपरीत परिणाम होईल म्हणून विचित्र परिस्थिती सुद्धा शांत डोक्याने विचार करून मार्ग शोधणेहे महान कार्य करण्याची जबाबदारी पालकाला पूर्ण करावी लागणार आहे गुरु या नात्याने.
मुलांचे प्रश्न समजावून घ्या
मित्रांनो, पालक या नात्याने आपणास बरेच काही सांगणे ही आवश्यक आहे. मुले दिवसेंदिवस लहानाची मोठे होतात. कुटुंबात समाजात वागताना त्यांच्या वागण्या कडे फक्त लक्ष ठेवा. मुल आपल्या वयाचे सम वयस्क झालेली असते. मुले आणि मुली या दोन घटकांमध्ये एकमेकाकडे आकर्षित होण्याच्या घटना घडणारे हे त्यांचे वय असते. हे वय समजून घ्या. या वयात मार्गदर्शन करा. त्यांच्या भावना दडपून टाकू नका. दडपून टाकलेली भावना कधीही उफाळून वर येऊ शकते. म्हणून मुलांना समजून घेण्याची गरज आहे. आकर्षण साहजिक आहे. ही एक नैसर्गिक मानवी वयाने निर्माण केलेली मनोवृत्तीआहेत
. मुलांचे मुलींकडे आकर्षण करणारे वय त्याचबरोबर मुलींचे मुलांकडे आकर्षण करणारे हे वय असते. या वयात पालक हा मुख्य सर्व मुलांच्या समस्या समजून घेणारा महत्त्वपूर्ण गुरु असतो. अशा वेळेस जर आपणाला ह्या कल्पना पालक या नात्याने आढळून आल्यास. प्रेमाने त्याला जवळ घ्या.
सर्व कल्पना मन मोकळेपणाने त्याच्याकडून किंवा तिच्याकडून काढून घ्या. यावर योग्य मार्गदर्शन करून उपाययोजना करा. मुले आणि मुलींचे कोडे सोडवणे आणि संबंधाबाबत कोडे सोडवणे हे एवढे सोपे काम नाहीत. प्रत्येक क्षणाला आपला मुलगा काय करतो आहे याचे थोडे बारकाईने निरीक्षण करा. निरीक्षण करताना त्याला ह्या गोष्टीची कल्पना येऊ देऊ नका. तसेच त्याच्याजवळ उघड उघड बोलूही नका. त्याला अनेक प्रकारची अशी घडलेली
वर्तमानपत्रातील शांत मनाने वाचून दाखवा. त्याचा परिणाम काय होतो याची जाणीव करणारे अनेक माध्यमे त्याला समजावून सांगा. मुलांना कौशल्याने ह्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन आई आणि वडील हेच पालकाचे मुख्य गुरु असल्यामुळे तुम्ही हे सर्व समजावून घेऊन योग्य मार्गाला लावण्याची जबाबदारी स्वीकारून याचे परिणाम जाणीवपूर्वक आपल्या मुलाच्या प्रेमाने लक्षात आणून द्या. मात्र ह्या भावना तुम्ही जर दडपून टाकल्या तर केव्हा उफाळून बाहेर येईल आणि काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही.
कुटुंब हे मुलांना नैतिक व अनैतिकते चे धडे देणारे शैक्षणिक विद्यालय आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही. कुटुंब ही नागरी जीवनाची पहिली पाठशाळा आहे. या पाठशाळेत काम करणारे शिक्षक म्हणजे पालक. पालक म्हणजे आई वडील हेच मुलाचे सर्वांगीण विकास घडवणारे शैक्षणिक केंद्र आहेत.
हिन दर्जायुक्त वागणूक नको
पालकाची म्हणजेच आई वडिलांची मुलांना वागणूक ही हिन दर्जाची नसावी. मुलगा शाळेतून आल्याबरोबर त्याला हिन दर्जा देऊ नका. सतत तू टीव्ही पुढे मठ्ठबुद्धीने बसू नकोस. तुला काही येत नाही. तू ढ आहे. तू पुढे काही करू शकत नाही. तू डाखोरा च आहे. तुला काय करता येणार आहे जीवनात. तुझ्यासारखा अपयशी मुलगा दुसरा कोणी नाही. तू नेहमी वाईट वागतोस. तू काही करू शकत नाही. धड तुलाच अभ्यासही चांगला करता येत नाही. पाच वाजता क्रिकेट खेळायला पडतो. शाळातून आल्यावर झोपी जातो. अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो. तुझ्या एवढ्या मंद बुद्धीचा जगात कोणीच नाही. पालकाकडून वरील प्रमाणे नकारात्मक रीतीने आपल्या पाल्याची आपण वर्तणूक केल्यास मुलांना वाईट वाटते. आपले वडील च आपल्याला हिन समजत आहे. तर मग दुसरे काय म्हणून हीन समजणार नाही. याचा परिणाम मुलावर झाल्याशिवाय राहत नाही.
सकारात्मक भावना ठेवा
पालकांनी आपल्या पाल्य बद्दल सकारात्मक भावना ठेवून योग्य मार्गदर्शन करावे. पालक हाच त्याचा मुख्य गुरु आहे. त्याला नाटकात भाग घेण्यास सांगा. शाळेत होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याचा उत्साह वाढवा. अभ्यास करण्यातही सुद्धा उत्साह वाढवा. जगात जगात अशक्यप्राय काहीच नाही. प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रयत्न केले तर जगातील कोणती गोष्ट आपण साध्य करू शकतो. त्यासाठी परिश्रम करण्याची सवय पाल्यास लावा. त्याच्याजवळ त्याचा मित्र म्हणून तुम्ही स्वतः बसा आणि त्याच्याकडून कार्य करून घ्या. तो जे कार्य करत आहे . आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास करणारे कुटुंबातील पहिले एकमेव गुरु म्हणून आई-वडील हेच असतात.त्यामुळे या विषयावर सविस्तर माहिती उपरोक्तपणे दर्शविण्यात आली आहे.
सारांश
पालकांनो ह्या लेखाच्या अंतर्गत ब्लॉगर या नात्याने मी आपणास सांगू इच्छितो की आपण आपल्या पाल्याचे जास्त लाड ही करू नका तसेच त्याला शरणागती पत्करायला ही सुद्धा लावू नका. बाल वयापासून तर ते मोठ्या वयापर्यंत तुमच्या कुटुंबातील एक घटक असल्यामुळे आपल्या मुलास प्रेम युक्त शिस्त शिकवा. शिस्त आमुचा बाणा. ह्या मराठी म्हणी प्रमाणे काम करा. आपल्या पाल्याचे खरे शिक्षण आपल्याच कुटुंबात बालवयातच सुरू झालेले असते. फक्त आपल्या पाल्यांच्या मना त असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या संकल्पना साठी योग्य मार्ग दाखवा. योग्य मार्ग दाखवल्या स त्या मार्गाने पाल्य वाटचाल करत राहील. घरामध्ये शाळेमध्ये समाजामध्ये आणि संपूर्ण भारतात आपण कसे वागावे याबाबत त्याला योग्य करणे ही पालकाची मुख्य जबाबदारी पालकांनी ओळखून पाल्याला स्वातंत्र्य तर द्याच पण एवढी स्वातंत्र्य देऊ नका ती एका पिढी तून दुसऱ्या पिढीत पदार्पण करताना त्याच्या हातून मोठ्या चुका होणार नाहीत. जग फार झपाट्याने बदलत आहे. काळाच्या ओघामध्ये विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये पाल्याकडे आई-वडिलांचे दुर्लक्ष होत आहे. शक्यतो ते दुर्लक्ष होऊ देऊ नका याचे मुख्य कारण म्हणजे आई वडील हेच पाल्याचे खरे पहिले गुरू आहेत.
पाल्य वयात आल्यानंतर त्याचे व्यक्तिमत्व बदलत असते त्याच्या आवडीनिवडी बदलत असतात. या गोष्टीचा सखोल विकास करून त्याच्या अंगात असणाऱ्या सर्व क्षमता वाढवण्याची क्षमता फक्त आई-वडिल कडे च असते. मुलगा शाळेत फक्त सहा तास असतो तर 18 तास आपल्या कुटुंबासोबत असतो. 18 तासात आई-वडिल ला जेवढे चांगले घडवता येईल तेवढे आपल्या पाल्याला घडवा. शाळेत तर प्रयत्न सुरूच असतात पण त्या बाहेरी सुद्धा प्रयत्न करण्याची मुख्य जबाबदारी ही गुरु या नात्याने पालकाची आहे
ब्लोगर ने ब्लॉग पोस्ट साठी लिहिलेल्या लेखात काही तांत्रिक त्रृटी आढळून आल्यास ब्लॉगच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या सूचना, अभिप्राय, प्रतिक्रिया आणि त्रृटी आवश्यक कळवा. योग्य वाटल्यास आपल्या त्रृटीच्या संदर्भात हा लेख अद्यावत त्वरित करण्यात येईल.
FAQ
1) विद्यार्थ्यांचे पहिले गुरू कोण आहे?
उत्तर-विद्यार्थ्याचे पहिले गुरु आई -वडील आहे.
2) कुटुंबा त लहान मूल कोणाचे अनुकरण करतात?
उत्तर-कुटुंबामध्ये लहान मूल घरातील व्यक्ती आणि कुटुंबातील सर्व सदस्य आई वडिलांसह अनुकरण करतात.
3) आधुनिक युगात वडिलांनी मुलासोबत कसे राहावे?
उत्तर-आधुनिक युगात वडिलांनी मित्र म्हणून गुरुचे कार्य करणारे असावे.
4) विद्यार्थ्यांना चांगली घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण कोणतीही एक बाब सांगा?
उत्तर-विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीने विचार करून आपले महत्त्वपूर्ण गुण विकसित करावे.
5) मुलांना आज काय शिकवण्याची गरज आहे?
उत्तर-जगातील वास्तविकता शिकवण्याची मुलांना गरज आहे.
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख अवश्य वाचा.
अधिक माहितीसाठी आमच्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनेल चे व्हिडिओ अवश्य पहा.